Posts

Showing posts from November, 2022

वर्णी महापूजेने अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष महोत्सावास प्रारंभ

Image
अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरात आराध बसण्यासाठी महिलांची मोठी गर्दी  ============== ========= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत साजरा होत आहे. आज बुधवारी सकाळी वर्णी महापूजेने मार्गशीर्ष महोत्सवास प्रारंभ झाला. अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव व सौ.शिवकन्या यादव यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापूजा केली. या वर्णी महापूजेने या महोत्सवाची सुरूवात झाली.  मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदीर परिसरात सलग नऊ दिवस आराध बसण्याची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. या वर्षी मंदिरात जवळपास ४ हजार महिला बसल्याची माहिती देवल कमिटीच्या वतीने देण्यात आली. बुधवारी सकाळी झालेल्या महापूजेनंतर महिलांची मंदिरात आराध बसण्यासाठी गर्दी वाढू लागली होती. शहर वासियांनी योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा केल्या होत्या. यावेळी झालेल्या महापूजेला अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव व सौ.शिवकन्या यादव यांनी...

शब्द परिवार विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दगडू दादा लोमटे यांचा नागरी सत्कार

Image
सर्वसामान्य कुटुंबातील दु:खी माणसं उभी करण्यात मिळतो आनंद - दगडू लोमटे  ======================= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) स्वत: उभे रहाण्यापेक्षा सर्वसामान्य कुटुंबातील दु:की लोक उभी करण्यात आपल्याला आनंद आणि आत्मसंतुष्टी मिळते असे मत शब्द परिवार आयोजित विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दगडू लोमटे यांनी व्यक्त केले. शब्द परिवार विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्काराला उत्तर देताना दगडू लोमटे बोलत होते. आपल्या विस्तारीत भाषणात दगडू लोमटे पुढे म्हणाले की, मला वैयक्तिक स्वतः उभं राहण्यापेक्षा माणसं उभी करण्यात आनंद  उभी करण्यात जास्त आनंद मिळतो. जे गुण आपल्यात नाहीत व इतरांमध्ये आहेत अशा लोकांच्या पाठिशी उभे राहण्यात आनंद मिळतो. आयुष्यभर सतत नवीन काही तरी शिकत राहण्यात आनंद मला आनंद मिळतो.         कविता लिहिण्याचा मला लहाणपणापासूनच आवड होती. मी कविता ही भरपुर लिहिल्या, प्रसिद्ध ही झाल्या. हे होत असतानाच विनोद रापतवार आणि मी दोघांनी मिळून शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या ...

ब्रेकिंग न्युज : पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर 15 डिसेंबर 2022 पर्यंत करता येतील अर्ज

Image
ब्रेकिंग न्युज : पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर 15 डिसेंबर 2022 पर्यंत करता येतील अर्ज ======================= मुंबई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.  15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस भारती 2022: पोलीस भरती 2022 नवीन अपडेट्स. ताज्या बातमीनुसार, पोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठी आता 15 दिवसांची मुदत वाढविण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. • तसेच आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. • राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. • अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवा...

प्रासंगिक लेख - अंबाजोगाईची महात्रिपुरसुंदरी आदिमाता : श्री योगेश्वरी देवी

Image
अंबाजोगाईची महात्रिपुरसुंदरी आदिमाता : श्री योगेश्वरी देवी ========================                मनोहर अंबाजोगाई शहर हे मराठी भाषेचे माहेरघर समजले जाते. या नगरीमध्ये मराठीचे आद्यकवी, 'विवेकसिंधू'चे निर्माते, श्री मुकुंदराज स्वामी आणि मराठी साहित्यातील मेरूमणी, सतराव्या शतकातील संत साहित्याचे नवकोट नारायण असा ज्यांचा आदरपूर्वक उल्लेख केला जातो ते सर्वज्ञ दासोपंत यांची कर्मभूमी देखील अंबाजोगाईच. दासोपंतांची पासोडी ही मराठी साहित्य शारदेचे महावस्त्र समजली जाते. महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईची ग्रामदेवता योगेश्वरी देवी आहे. शक्तीची देवता म्हणूनही आपण हिला ओळखतो. आणि देवीच्या या स्थानाला शक्तीपीठ असे म्हणतात. कोकणस्थांची - चित्पावनांची कुलदेवता म्हणूनही तिचे मोठे महत्त्व आहे. परराज्यातूनही या देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक येतात. अंबाजोगाई हे प्राचीन नगर आहे. अंबाजोगाई आणि परिसरात एकूण दहा शिलालेख सापडलेले आहेत. यापैकी एका शिलालेखात शके १०६५ च्याही पूर्वी योगेश्वरी देवीचे मंदिर अस्तित्वात असल्याचे उल्लेख आपल्याला...

‘अभाविप’च्या राष्ट्रीय मंत्रिपदी अंकिता पवार यांची निवड

Image
अंकिता पवार यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत ========================= छञपती संभाजीनगर (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)   देशातील सर्वांत मोठी विद्यार्थ्यांची संघटना अशी ओळख असणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय मंत्रिपदी अंकिता पवार यांची निवड करण्यात आली आहे. अंकिता पवार यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडविलेले आहेत. हि निवड आपल्या कामाची पावती असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. अंकिता पवार या मुळच्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील कार्यकर्त्या आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य, प्रदेश सहमंत्री, प्रदेश मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या आहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या जयपूर येथील राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय मंत्रिपदी अंकिता पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नविन दायित्वा बद्दल अंकिता पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ========================

मौजे पाटोदा (ममदापूर) येथे एका विशेष समारंभात संविधान स्तंभाचे लोकार्पण

Image
मौजे पाटोदा (ममदापूर) येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या संविधान रॅलीने लक्ष वेधले ======================== अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) तालुक्यातील मौजे पाटोदा (ममदापूर) येथे भारतीय संविधान स्तंभ लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त गावात विविध उपक्रम राबविण्यात आले. मौजे पाटोदा (ममदापूर) ता.अंबाजोगाई येथे संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधान स्तंभ लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. संवेदना फेलोशिपच्या मुक्ता पाडुळे यांच्या संकल्पनेतून हा संविधान स्तंभ गावात उभारण्यात आलेला आहे. सर्वप्रथम गावामधून जिल्हा परिषद शाळेतील मुला-मुलींची संविधान रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये भारतीय संविधानात समाविष्ट असलेल्या विचारमुल्यांचे "उठ नागरिक जागा हो, संविधानाचा धागा हो" असे घोषवाक्य असलेले फलक मुला-मुलींनी विविध महापुरूषांची वेषभूषा साकारत झळकावले, तसेच यावेळेस भारतीय संविधानातील मुल्यांचा जागर करणारे छोटेखानी चिञप्रदर्शन देखिल भरविण्यात आले होते. या उपक्रमात गावातील सर्वधर्मीय ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेत विद्यार्थी व शिक्षकांचे कौतु...

परळी तालुक्यात अंकुश गरड या तरूण शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

Image
कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेले शेतकरी अंकुश गरड यांच्या कुटुंबियांचे सामाजिक कार्यकर्ते ॲड.माधव जाधव यांनी केले सांत्वन ======================== परळी वैजेनाथ (विशेष प्रतिनिधी) तालुक्यातील कौठळी येथील अंकुश गरड या तरूण शेतकऱ्यानी कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली असून त्या कुटुंबाची सुप्रसिद्ध विधीज्ञ तथा समाजसेवक ॲड.माधव जाधव यांनी भेट घेऊन गरड कुटुंबाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन याप्रसंगी माधव जाधव यांनी दिले. परळी तालुक्यात व बीड जिल्ह्यात सातत्याने शेतकरी आत्महत्याचं सत्र चालूच असून कौठळी येथे अंकुश गरड या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. मुळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत व काही अडचण असेल तर बोलून दाखविली पाहिजे ज्यातून मार्ग काढता येईल. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत असे आवाहन याप्रसंगी ॲड.माधव जाधव यांनी केले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवाकराम जाधव, तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, तालुका उपाध्यक्ष भागवत जाधव, मराठा सेवा संघाचे गंगाराम अण्णा जाधव, मंचकराव गरड, गोपाळ शिंगाडे, उत्तम गरड ,ब...

लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क

Image
शैक्षणिक संस्थाकडून शिक्षण व सामाजिक परिवर्तनाची गरज  - प्रख्यात साहित्यिक व माजी आमदार राम कांडगे यांचे मत ================ अंबाजोगाई (विशेष प्रतिनिधी) शैक्षणिक संस्थाकडून शिक्षण व सामाजिक परिवर्तनाची गरज आहे हे काम यशवंतराव चव्हाण यांनी आयुष्भर केले. देशाला आज त्यांच्या विचारांची खरी गरज आहे असे मत प्रश्न प्रख्यात साहित्यिक, माजी आमदार तथा रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राम कांडगे यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती चव्हाण समारोहाच्या समारोपीय  कार्यक्रमातील अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर स्मृती समारोह समितीचे सचिव दगडू दादा लोमटे, पुरस्कार प्राप्त मान्यवर पंजाबराव देशमुख, सौ.इंदुमती जोंधळे, सुर्याची बाबुराव बोरगावकर, प्रदीप जोगदंड आणि रजनी वर्मा यांची उपस्थिती होती. आपल्या विस्तारीत भाषणात बोलतांना राम कांडगे पुढे म्हणाले की, राज्याची खरी संताची परंपरा आहे. नम्रता हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे. संत ज्ञानेश्वर, तुकारामांनी मानवतावाद सांगितला. बालवयातच  यशवंतरावांच्या आई विठाबाई त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी वाचून घ्यायच्या त्यामुळे त्यांच्यावर  ज्ञानेश्वरीच्...

लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क

Image
शेत व शेतकरी वाचवायचा असेल तर राजकारणापलीकडे जाऊन विचार केला पाहिजे - ॲड.अजय बुरांडे  ------------------------------- अंबाजोगाई (विशेष प्रतिनिधी)  आज शेत व शेतकरी धोक्यात आहे. शेती सारखा मोठा व्यवसाय भांडवलदार कंपन्यांकडे जाणार नाही. याची दक्षता घेऊन शेत व शेतकरी वाचविण्यासाठी राजकारणापलीकडे जाऊन विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते एॅड.अजय बुरांडे यांनी केले. येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहातील तिसऱ्या दिवसाची सुरूवात शेतकरी परिषदेने झाली. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून एॅड.अजय बुरांडे बोलत होते. शेतकरी परिषदेसाठी वक्ते म्हणून कृषी महाविद्यालय, अंबाजोगाईचे प्राचार्य डॉ.संजीव बंटेवाड हे होते. तर अध्यक्षस्थानी प्रयोगशील शेतकरी पंजाबराव देशमुख व स्मृती समारोह समितीचे कोषाध्यक्ष व शेतकरी परिषदेचे संयोजक सतीश नाना लोमटे व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या विस्तारित भाषणात एॅड.अजय बुरांडे यांनी "शेती शेतकरी आणि पीक विमा" या विषयावर सखोल मार्गदर्शन करून पीक विमा ही शेतकऱ्याच्या हितासाठी आहे का विमा कंपनीच्या हितासाठी आहे असा सवाल करून अनेक जाचक अटींमध्ये बदल झाल...

ज्येष्ठ संगीतकार व गायक प्रा.राजेश सरकटे यांनी संगीतबद्ध केलेल्या "मराठवाड्याचे काव्यवैभव" या संगीतमय कार्यक्रमास रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद..!

Image
ज्येष्ठ संगीतकार व गायक प्रा.राजेश सरकटे यांनी संगीतबद्ध केलेल्या "मराठवाड्याचे काव्यवैभव" या संगीतमय कार्यक्रमास रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद..! ================ अंबाजोगाई (विशेष प्रतिनिधी - तालमार्तंड प्रकाश बोरगावकर याजकडून) यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहामध्ये ज्येष्ठ संगीतकार व गायक प्रा.राजेश सरकटे यांनी संगीतबद्ध केलेल्या "मराठवाड्याचे काव्यवैभव" हा काव्य आविष्काराचा संगीतमय कार्यक्रम यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या दुसऱ्या दिवशी संपन्न झाला. एकूण मराठी काव्यात गाथा, लावणी, पोवाडे, ओव्या, आरत्या,भजने, गवळणी, भारूडे, भोंडल्याची गाणी इत्यादींचा समावेश होतो. मराठी भाषेत संतकाव्य मोठ्या प्रमाणात लिहिले गेले. पंडिती काव्य, छंदोबद्ध काव्य, चारोळी, चित्रपट गीते, नाट्य संगीत यांचा समावेश होतो. कवी मुकुंदराज यांना मराठीचे आद्यकवी म्हणून संबोधले जाते. त्यांनी विवेकसिंधू हा काव्यग्रंथ लिहिला आहे. अशा या आद्यकवींच्या नगरीमध्ये मराठवाड्याची काव्यवैभव ही आगळीवेगळी मैफिल साहित्य रसिकांना मंत्रमुग्ध करून देणारी ठरली. संत महदंबा, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव संत जनाबाई, सं...

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा

Image
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फ डणवीस, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार आणि माजी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली ================ मुंबई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) मराठी आणि हिंदी चित्रपट आणि नाटक क्षेत्रात आपल्या अभिनयाने दबदबा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे काही तासांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपट जगताचे कधीही न भरून येणारे नुकसान झाल्याची भावना सर्वांच्या मनात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विक्रम गोखले यांना ट्वीटरच्या माध्यमातून गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मराठी व हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. त्यांचा जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपटक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”, असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस लिहितात, “मराठी आणि...

यशंवतराव चव्हाण स्मृती समारोहच्या शालेय चित्रकला स्पर्धा व बालआनंद मेळाव्यास विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद

Image
यशंवतराव चव्हाण स्मृती समारोहच्या शालेय चित्रकला स्पर्धा व बालआनंद मेळाव्यास विद्यार्थ्यांचा अ भूतपूर्व प्रतिसाद ; तालुक्यातील 50 शाळेतील सात हजार विद्यार्थ्यांचा सहभाग ================ अंबाजोगाई (विशेष प्रतिनिधी)  38 व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहच्या दुस-या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरूवात शालेय चित्रकला स्पर्धा व बाल आनंद मेळाव्याने झाली. “शालेय चित्रकला स्पर्धा” हे या समारोहातील वैशिष्ठ पूर्ण उपक्रम आहे. या स्पर्धेत अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शाळेतील शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यंदा तालुक्यातील 50 पेक्षा जास्त शाळेतील सात हजार तीनशे विद्यार्थ्यांनी “रंगभरण व स्मरण चित्रे” स्पर्धेत सहभाग नोंदविला. यंदा दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविनला होता. या शालेय चित्रकला स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना एस.पी. महाविद्यालय, पुणे येथील प्रा.विनय आर.आर. यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी प्रसिध्द शिल्पकार प्रदीप जोगदंड, सौ. रजनी वर्मा व सहशिक्षक युवराज माने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी समितीचे सचिव दगडुदादा लोमटे होते. या प्रसंगी युवराज माने...

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जीवन जगण्याचा मंत्र दिला - रामभाऊ कुलकर्णी

Image
खोलेश्वर महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा ========================= अंबाजोगाई (विशेष प्रतिनिधी) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दूरदृष्टी ठेवून भारतीय संविधान लिहीले. व्यक्तीची प्रतिष्ठा, हक्क, कर्तव्य, इत्यादींचा अंतर्भाव आणि मानवतेची जाणीव ठेवून संविधान लिहिले. भारताच्या आदर्श लोकशाहीला दिलेले हे संविधान अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या व्यक्तिगत जीवनात प्रत्येकाने या संविधानाची अंमलबजावणी केली पाहिजे. त्यासाठी महामानव डॉ.आंबेडकरांनी जीवन जगण्याचा मंत्र दिला, असे गौरवोद्गार केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष रामभाऊ कुलकर्णी यांनी केले. ते राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. मंचावर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश तळणीकर, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी, राज्यशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.तात्या पुरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून भित्तीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते...

कृषी महाविद्यालय लातूर येथे पदवी पूर्व अभिमुखता कार्यक्रम व प्राध्यापक,विद्यार्थी व पालक सुसंवाद मेळाव्याचे आयोजन

Image
विद्यार्थ्यांनी संस्कार, जीवनमूल्ये व आत्मविश्वास याचा अंगिकार करावा - सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे ========================= लातू र (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) कृषि महाविद्यालय लातूर येथे शुक्रवार,दिनांक २५ नोव्हेंबर रोजी शैक्षणिक वर्ष २०२२-२३मधील नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी कृषि पदवी शिक्षणाची ओळख आणि प्राध्यापक, विद्यार्थी व पालक सुसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभिमुखता कार्यक्रमात नूतन शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना बी.एस्सी (मानद) कृषि पदवी अंतर्गत कार्यक्रम,विषयनिहाय मूल्यमापन, महाविद्यालयातील उपलब्ध सोयी-सुविधा, विविध कृषि विषयक विभागांची ओळख व कार्यपद्धती, कृषि शिक्षणातील उच्चशिक्षण, नोकरी व व्यवसायाच्या संधी याबाबत माहिती, महाविद्यालयातील उच्चविद्या विभूषित प्राध्यापक व कर्मचारी यांचा परिचय आणि विद्यार्थी,पालक व प्राध्यापक यांचा सूसंवाद घडवून आणला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालय लातूरचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे हे होते, कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज...
Image
लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आपण विसरत चाललो आहोत का..? - यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या उदघाटनात विश्वास पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न ========================= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आपण विसरत चाललो आहोत का असा प्रश्न प्रख्यात साहित्यिक विश्वास पाटील यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती चव्हाण समारोहाच्या उदघाटनीय कार्यक्रमात उपस्थित केला. यावेळी विचारमंचावर स्मृती समारोह समितीचे सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे हे मान्यवर उपस्थित होते. अंबाजोगाई येथे मागील ३८ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे उद्घाटन कार्यक्रमात पाटील हे बोलत होते. आपल्या विस्तारीत भाषणात विश्वास पाटील यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या उदघाटकीय भाषणाची सुरूवात करताना या समारंभाचे कौतुक करीत असा समारोह पश्चिम महाराष्ट्रात कोठे ही होत नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या नावावर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांच्या चिमणीतून मोठा धूर निघतो. मात्र यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जागविण...

अंबाजोगाई येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावणार - आ.सतीश भाऊ चव्हाण

Image
अंबाजोगाई येथे विद्यापीठ सिनेट निवडणूकीतील उत्कर्ष पॅनेलच्या प्रचारार्थ पदवीधर मेळावा संपन्न ; परीसरातील पदवीधरांची मोठी उपस्थिती ======================== अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) आज अंबाजोगाई येथे उत्कर्ष पॅनेलच्या वतीने आ.सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदवीधर मेळावा आयोजित करण्यात आला. अंबाजोगाई परीसरातील पदवीधरांची मोठी उपस्थिती होती. यावेळी आ.सतीश चव्हाण यांनी डॉ.नरेंद्र काळे यांच्या विद्यापीठातील कामाचे कौतुक केले व भविष्यात विद्यापीठाचे उपकेंद्र अंबाजोगाई येथे करण्यासाठी सर्व ताकद लावु असे आश्वासन दिले. यावेळी मुप्टा संघटनेचे अध्यक्ष प्रा.सुनील मगरे, प्रा.मुंजा धोंडगे, प्राचार्य डॉ.बाबासाहेब गोरे, प्राचार्य अखिला गौस  व आ.सतीश भाऊ चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या निवडणुकीतील उमेदवार व मावळते व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.नरेंद्र काळे यांनी प्रास्ताविक केले. त्यावेळी डॉ.नरेंद्र काळे यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचा आढावा मांडला व पुन्हा विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी आ.पृथ्विराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड.राजेश्वर चव...
Image
लोककलेचा अथांग सागर : डॉ.गणेश चंदनशिवे {तिसरे राज्यस्तरीय वऱ्हाड लोककला संमेलन, आज दि.२३ नोव्हेंबर २०२२ रोजी अकोला येथे संपन्न होत आहे.संमेलन अध्यक्ष आमचे मार्गदर्शक प्रख्यात लोककलावंत डॉ.गणेश चंदनशिवे यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे यांचा परिचयात्मक लेख खास लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्कच्या वाचकांसाठी देत आहोत...} तिसरे राज्यस्तरीय वऱ्हाड लोककला संमेलनाध्यक्ष प्रख्यात लोककलावंत-संशोधक डॉ.गणेश चंदनशिवे म्हणजे लोककलेचा अथांग सागर होय.  लोककला-साहित्य-संस्कृती-शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात डॉ.गणेश चंदनशिवे  अभूतपूर्व कार्य करीत आहेत.त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेऊन  वऱ्हाड शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था लोणी, अकोला यांनी डॉ. गणेश चंदनशिवे यांचा बहुमान केला आहे. डॉ. गणेश चंदनशिवे यांचे कार्य  केवळ कौतुकास्पदच नाही तर आपली लोककलेशी असणारी नाळ किती घट्ट आहे हे दर्शविणारे आहे. त्यांच्या अलौकिक  कार्याला मानाचा मुजरा....!  एक चांगला मित्र ,तज्ज्ञ मार्गदर्शक, समाजसेवक  आणि कला संस्कृती जपणारा-जगणारा एक उत्कृष्ट ल...