Posts

Showing posts with the label अंबाजोगाई

पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचा आणखीन एक निर्णय ठरतोय देशातील शेतकऱ्यांसाठी फायद्याचा..! साठवणुकीचे निर्बंध हटवले अन् सोयाबीनचे भाव वाढले - भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी

Image
पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचा आणखीन एक निर्णय ठरतोय देशातील शेतकऱ्यांसाठी फायद्याचा..! साठवणुकीचे निर्बंध हटवले अन् सोयाबीनचे भाव वाढले - भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी अंबाजोगाई (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक निर्णय घेतल्यानंतर त्यामागे शेतकर्‍यांचे कसे भले होते ? हा आर्थिक चमत्कार देशातील समस्त शेतकरी बांधवांनी चार दिवसांपूर्वीच अनुभवला आहे. केंद्र सरकारने सोयाबीन व इतर तेलबीयांच्या साठवणुकीवरील निर्बंध हाटवता क्षणीच अवघ्या काही तासातच सोयाबीनचे भाव वाढले. पाच हजारी असलेले सोयाबीन या निर्णयामुळे सहा हजार रूपयांपर्यंत पोहोचले. कदाचित सात हजार जावू शकेल. नेतृत्वात कल्याणाची दुरदृष्टी असेल तर त्याचा फायदा कसा होतो ? या कृतीतून देशवासियांनी पाहिला असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केले.  आमच्या प्रतिनिधी बोलताना कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, मागच्या आठवड्यात देशातील शेतकर्‍यांनी केंद्र सरकार तथा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या एका निर्णयाचा घेतलेला अनुभव आर्थिकदृष्ट्या क्रांतीकारक कसा ठरला ? ज्यातून सिद्ध झालं. वास्तविक पहाता मागच्या आठ वर्षांपास...

भारत जोडो याञेत बीड जिल्ह्यातून २५ हजार काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक सहभागी होणार - जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख

Image
भारत जोडो याञेत बीड जिल्ह्यातून २५ हजार काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक सहभागी होणार - जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख अंबाजोगाई (वार्ताहर) "भारत जोडो यात्रा" ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुरू केलेले एक मोठे आणि विधायक जनआंदोलन आहे, ज्याचा उद्देश नवी दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कथित विभाजनवादी राजकारणा विरूद्ध देशाला एकत्र आणणे आहे. ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. देशाची लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे, तसेच वाढती महागाई, बेरोजगारी, सत्तेचे राजकीय केंद्रीकरण आणि विशेषत: भय, कट्टरता आणि द्वेषाच्या विखारी राजकारणाविरूद्ध लढण्यासाठी हे जनआंदोलन तयार करण्यात आले असून मंगळवार, दिनांक ८ नोव्हेंबर रोजी भारत जोडो याञेत बीड जिल्ह्यातून २५ हजार काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक यात्रेत सहभागी होवून खा.राहूलजी गांधी यांच्यासोबत चालणार आहेत अशी माहिती देवून काँग्रेस प्रेमी जनता, शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, कामगार, सर्व समाज घटक, नागरिक, महिला, युवक आणि युवती यांनी या यात्रेत हजारोंच्या सं...