Posts

Showing posts from February, 2023

युवा आंदोलनच्या मागणीला यश : राज्य सरकारने लाड - पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला

Image
- युवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके यांची माहिती ======================== अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या युवा आंदोलनच्या मागणीला यश आले आहे. तर राज्यातील हजारो सफाई कामगारांना दिलासा मिळाला आहे, कारण, राज्य सरकारने लाड - पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत अशी माहिती युवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके (अंबाजोगाई) यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके यांनी सांगितले की, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत मधील सफाई कामगारांना लाड - पागे समितीच्या शिफारशी लागू करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आम्ही युवा आंदोलनच्या वतीने महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे २० जानेवारी २०२३ रोजी दिलेल्या निवेदनातून केली होती. सदरील निवेदनावर युवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके, मुंबई जिल्हाध्यक्ष संजय साळवे, पुणे जिल्हाध...

संगणक तज्ज्ञ शंकर चव्हाण यांचा लेख " कंट्रोल झेड नेव्हर इन आवर लाईफ..."

Image
आयुष्य खुप सुंदर आहे, ते सुंदर आयुष्य आनंदानं जगण्यासाठी धडपड करा..! कंट्रोल झेड ही क्रिया संगणकाशी निगडीत आहे. त्यामुळं ती समजून घेणं महत्वाचं आहे. कंट्रोल झेड ही एक कॉम्प्युटरवर दैनंदिन कामकाज करतांना वापरली  जाणारी शॉर्टकट की आहे अर्थात काम करत असतांना एखादी क्रिया आपल्याला नको असेल किंवा एखादी झालेली चूक, क्रिया पूर्ववत करण्यासाठी या कीज चा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे संगणकावर केलेल्या कामात अचूकता येते. ही की, Undo या सुवीधेचे संक्षिप्त रुप आहे. तुम्ही कधीही जीवघेण्यास स्पर्धेच्या युगात अशा चुका करु नका की, त्याला Undo हे ऑप्शन अर्थात कंट्रोल झेड नसणार आहे. आयुष्याच्या पायर्‍या चढत असतांना कधीही मागे वळुन पाहू नका. इतिहासाच्या अभ्यास करतांना मागे वळुन जरुर पहा कारण आयुष्याच्या पायर्‍या ह्या जोपर्यंत यश संपादन होत नाही तोपर्यंत चढयच्याच असतात व इतिहासाचा अभ्यास करतांना अनुभवाच्या जोरावर आपलं जीवन जगायला शिकायचं असतं. प्रत्येकजण आयुष्यामध्ये रोज नवनवीन गोष्टी शिकत असतो. अर्थात माणूस आयुष्यभर काही ना काही शिकतच असतो, व्यक्ती हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. पण हे सर्व काही हो...

भविष्याचा वेध घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्षम बनावे - शिवाजीराव खोगरे

Image
जयप्रभा माध्यमिक विद्यालयातील १० वी वर्गातील विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ =======================  अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)  तालुक्यातील कुंबेफळ येथील जयप्रभा माध्यमिक विद्यालयात गुरूवार, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी थोर समाजसुधारक, राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी करून इयत्ता वर्ग १० वी वर्गातील विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांनी सदिच्छा समारंभात एस.एस.सी.बोर्ड परीक्षा मार्च - २०२३ साठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव खोगरे व प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अभियंता शरदराव देशपांडे हे उपस्थित होते. तर सदिच्छा समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बन्सी पवार हे होते, उपस्थित सर्वच मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच यावेळी रमाकांत यादव, अजय बुरगे, मल्हारी घाडगे, डॉ.बबन मस्के यांनी ही आपले समायोचित मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार...

नेपाळ - भारत बहुभाषिक साहित्य संमेलनात कविवर्य दिनकर जोशी यांच्या "सोनियाचा पिंपळ" कवितेने मिळवला वन्स मोअर..!

Image
जागतिक मातृभाषा दिनानिमित्त आयोजित बहुभाषिक साहित्य संमेलनात अंबानगरीचा गौरव  ======================= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) अक्षरयात्री प्रतिष्ठान, विटा (भारत) आणि भारतीय राजदूतावास काठमांडू (नेपाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित नेपाळ - भारत बहुभाषिक कवि संमेलनात निमंत्रित कवी दिनकर जोशी यांच्या "सोनियाचा पिंपळ" या कवितेने उपस्थित रसिक - श्रोते यांना मंत्रमुग्ध करीत वन्स मोअर मिळविला, या बहुभाषिक साहित्य संमेलनात निमंत्रित कवी जोशी यांच्या सक्रिय सहभागाने एकप्रकारे अंबानगरीचा गौरवच झाला. नुकतेच बुधवार, २१ फेब्रुवारी २०२३ रोजी भारतीय दूतावास नेपाळ व अक्षरयात्री प्रतिष्ठान विटा (जि.सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने काठमांडू येथे नेपाळ - भारत बहुभाषिक साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात संपन्न झाले. त्यानिमित्ताने मराठी, नेपाळी, मैथिली, अवधी, संस्कृत, हिंदी, भोजपुरी, ऊर्दू व इंग्रजी अशा १२ भाषेतील तब्बल ख्यातनाम ३० कवींनी आपल्या बहारदार आणि लोकप्रिय कविता सादर केल्या. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्‍वर मुळे य...

परळी तालुक्यातील दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम अवयव व साहित्य नोंदणीस उदंड प्रतिसाद

Image
सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली, जिल्हा समाजकल्याण कार्यालय जि.प.बीड, यशवंतराव चव्हाण सेंटर, महात्मा गांधी सेवा संघ व जिल्हा पुनर्वसन केंद्र अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ======================= परळी (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)- सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली, जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद बीड, यशवंतराव चव्हाण सेंटर, महात्मा गांधी सेवा संघ व जिल्हा पुनर्वसन केंद्र अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव, साहित्य साधानांसाठी नोंदणी व तपासणी शिबीराचे आयोजन आज दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी उपजिल्हा रूग्णालय परळी वै. येथे करण्यात आले. प्रारंभी शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.धनंजय मुंडे आरोग्य योजनेचे अध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ.अनिल गुट्टे, डॉ.व्यंकटेश तिडके, महात्मा गांधी सेवा संघाचे ऋषी सलगर, शेख निजाम भाई, परिचारीका मनिषा महाडकर, स्वाती जगतकर, शेख फेरोज भाई, विठ्ठल...

एपीएल शेतकरी योजनेमधून कमी झालेल्या लाभार्थ्यांची नांवे अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करा - अखिल भारतीय किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे

Image
अंबाजोगाई तहसील कार्यालयासमोर १ मार्च २०२३ रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा  ======================== अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) तालुक्यातील राडी गावातील एपीएल शेतकरी योजनेमधून कमी झालेल्या लाभार्थ्यांची नांवे अन्नसुरक्षा योजनेत तात्काळ समाविष्ट करावीत अशी मागणी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे व ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष धनराज कोळगीरे यांच्यासह एपीएल शेतकरी योजनेमधून कमी झालेल्या लाभार्थ्यांनी अंबाजोगाईचे तहसीलदार यांना मंगळवार, दिनांक २१ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे. अखिल भारतीय किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे व ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष धनराज कोळगीरे यांच्यासह एपीएल शेतकरी योजनेमधून कमी झालेल्या लाभार्थ्यांनी अंबाजोगाईचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मौजे राडी गावातील ए.पी.एल.योजनेतील लाभार्थ्यांचे मिळणारे स्वस्त धान्य (रेशन) राज्य व केंद्र सरकारने बंद केलेले असून एपीएल योजनेत समाविष्ट अनेक शेतकरी कुटुंबिय हे अन्नधान्यापासून वंचित राहत आहेत. एपीएल योजनेत राडी गावातील दिव्यांग, शेतमजूर, विधवा, परित...

सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल मराठवाडा साथीच्या विशेष गौरव पुरस्काराने होणार सन्मान

Image
23 फेब्रुवारी रोजी पुरस्काराचे होणार वितरण ; मित्र परिवाराकडून भिवा बिडगर यांचे अभिनंदन ======================= परळी वैजनाथ (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)   तालुक्यातील दाऊतपूर येथील सामाजिक क्षेत्रात सक्रीय काम करणारे (वाहून घेतलेले) सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांना मराठवाडा साथीच्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा "विशेष गौरव" पुरस्कार जाहीर झाला. समितीचे आयोजक मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी या पुरस्काराची नुकतीच घोषणा केली आहे.  त्याबद्दल त्यांचे सर्वस्तरांतून मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे. पुरस्काराकरीता निवड झाल्याचे पुरस्कार निवड समितीने त्यांना एका पत्राद्वारे कळविले आहे. सविस्तर वृत्त असे की, सामाजिक कार्य करीत असताना कोणताही व्यक्ती राजकीय ध्येय समोर ठेवूनच सामाजिक कार्यात उतरत असतो . मात्र, काही व्यक्तिमत्व समाजामध्ये असे आहेत की, सामाजिक कार्यात कोणताही वैयक्तिक हेतू समोर न ठेवता सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत, त्यामधील एक नाव सांगता येईल ते म्हणजे परळी तालुक्यातील दाऊतपूर येथील भूमिपुत्र भिवा ज्ञानोबा बीडगर होय. सामा...

चांदापुर येथे नवव्या बौद्धधम्म परिषदेचा शानदार समारोप

Image
धम्म सदाचार शिकवतो, त्यामुळे सुखाच्या प्राप्तीसाठी धम्माची वाट चालावी लागेल - पुज्य भदन्त महाविरो धम्म परीषदेस उपासक, उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती ; "श्रामनेर" शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद धम्म परिषदेचे “सम्यक संकल्प” या पेजवरून फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण ======================== अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) परळी तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण चांदापूर, जेतवन, वसंतनगर तांडा, मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही १९ फेब्रुवारी २०२३ रोजी नवव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म परिषदेला पुज्य डाॅ.भदन्त उपगुप्त महाथेरो (पुर्णा) यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म देसना देण्यासाठी पुज्य डाॅ.भदन्त इंन्दवंस्स महाथेरो (कुशीनगर), पुज्य भिक्खू धम्मशील थेरो (हिंगोली / बीड), पुज्य भन्ते महावीरो आणि पुज्य भिक्खू रत्नदीप थेरो (औरंगाबाद) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी, चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात...

मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे यश

Image
मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या संघाने पटकावले तृतीय पारितोषिक ====================== अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)  मातृमंदिर विश्वस्त संस्था निगडी, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत येथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. ही गोष्ट शाळेसाठी अत्यंत अभिमानाची आहे. या यशाबद्दल विजयी संघाचे व त्यांना मार्गदर्शन करणारे संगीत शिक्षक जयेंद्रजी कुलकर्णी सर यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्रजी आलुरकर, उपाध्यक्ष जीतेशजी चापसी, कोषाध्यक्ष सत्यनारायणजी लोहिया, कार्यवाह डॉ.हेमंतजी वैद्य, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.चंद्रकांतजी मुळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे, शहरातील केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामभाऊ कुलकर्णी, सौ.कल्पनाताई चौसाळकर, अविनाश तळणीकर, आप्पाराव यादव, सौ.वर्षाताई मुंडे, स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष विजयराव वालवडकर, कार्यवाह बिपीनदादा क्षीरसागर, शालेय समिती अध्यक्ष डॉ.अतुलदादा देशपांडे, उपमुख्याध्यापक...

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे यश

Image
५० व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या चि.यश अनंत घुले या विद्यार्थ्यांने पटकावला द्वितीय क्रमांक ========================= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)  बीड येथे संपन्न झालेल्या ५० व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात येथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चि.यश अनंत घुले याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. ही गोष्ट शाळेसाठी अत्यंत अभिमानाची आहे. या यशाबद्दल त्याचे व त्याला मार्गदर्शन करणारे सर्व विज्ञान शिक्षक यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्रजी आलुरकर, कार्यवाह डॉ.हेमंतजी वैद्य, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.चंद्रकांतजी मुळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे, शहरातील केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामभाऊ कुलकर्णी, सौ.कल्पनाताई चौसाळकर, अविनाश तळणीकर, मुख्याध्यापक आप्पाराव यादव, सौ.वर्षाताई मुंडे, स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष विजयराव वालवडकर, कार्यवाह बिपीनदादा क्षीरसागर, शालेय समिती अध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉ.अतुलदादा देशपांडे, उपमुख्याध्यापक शंकर वाघमारे,...

एकसंघ व बलशाली राष्ट्र निर्मितीसाठी शिवरायांची नीतीच पथदर्शक - माजी नगरसेवक डॉ.अतुलदादा देशपांडे

Image
श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगांचा आढावा घेत महाराजांच्या युद्धनीती, राजनीती, मनुष्यबळ विकसन, अर्थनीती, समय व्यवस्थापन,कुटनीती, प्रशासन,कायदा व सुव्यवस्था, नारी सन्मान या विविध आयामांवर प्रकाश झोत टाकला. आणि त्यांच्या या कार्यकर्तृत्वाची आजच्या समस्या निराकरणासाठीची उपयोगिता व पथदर्शकता स्पष्ट केली. एकसंघ व बलशाली राष्ट्र निर्मितीसाठी शिवरायांची नीतीच पथदर्शक आहे असे प्रतिपादन माजी नगरसेवक डॉ.अतुलदादा देशपांडे यांनी केले. येथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात आयोजित हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.पुढे ते म्हणाले की, परकीय आक्रमणांना थोपविण्यासाठी एक युगपुरूष समोर येतो व भारताचे रक्षण करतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. आजही काही अपप्रवृत्तीचे लोक भारताच्या अखंडत्वाला बाधा पोहचविण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना धडा शिकविण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून शिकवण व प्रेरणा घेण्याची ...

प्रख्यात कवी दिनकर जोशी आंतरराष्ट्रीय बहुभाषिक कवि संमेलनात सहभागी होणार

Image
काठमांडू (नेपाळ) येथे आंतरराष्ट्रीय बहुभाषिक कवि संमेलनाचे  21 फेब्रुवारीला आयोजन ======================== अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) अक्षरयात्री प्रतिष्ठान, विटा (भारत) आणि भारतीय राजदूतावास काठमांडू (नेपाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे औचित्य साधून आज मंगळवार, दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आयोजित नेपाळ - भारत बहुभाषिक कवि संमेलनात निमंत्रित कवी म्हणून पाचारण करण्यात आल्याबद्दल कविवर्य जोशी यांच्या निवडीचे साहित्य वर्तुळ, मिञ परीवार तसेच सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.   पुन्हा एकदा अंबानगरीचा सर्वदूर नांवलौकिक व अंबाजोगाईतील साहित्य रसिकांचा आनंद द्विगुणित होईल अशी महत्त्वपूर्ण घटना साहित्य क्षेत्रात या आठवड्यात घडून येत आहे. ते म्हणजे अंबाजोगाईचे प्रख्यात साहित्यिक व कवि दिनकर जोशी यांना आज 21 फेब्रुवारी रोजी अक्षरयात्री प्रतिष्ठान, विटा (भारत) आणि भारतीय राजदूतावास काठमांडू (नेपाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे औचित्य साधून अक्षरयात्रीचे 25 वे रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन मा.ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गद...

लातूर येथील कृषि महाविद्यालयात शिवजन्मोत्सव, क्रीडा व सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन

Image
छत्रपती शिवाजी महाराज हे चारित्र्यवान लोकराजे होते : ज्येष्ठ विचारवंत डॉ.सोमनाथ रोडे ======================== लातूर (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) कृषि महाविद्यालय, लातूर येथे रविवार,दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी ३९३ व्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयात शिवरायांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी वृक्षारोपण आणि प्रतिमापुजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे तर प्रमुख अतिथी म्हणून ख्यातनाम विचारवंत डॉ.सोमनाथ रोडे, डॉ.दिनेशसिंह चौहान, डॉ.प्रशांत करंजीकर, डॉ.ज्योती देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्या प्रसंगी बोलताना प्रमुख वक्ते डॉ.सोमनाथ रोडे यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी इत्यंभूत माहिती दिली. ते पुढे बोलताना म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या यशाचे गमक म्हणजे त्यांचे शुद्ध चरित्र, प्रबळ गुप्तहेर खाते, महाराजांना असलेलं उत्तम भौगोलिक ज्ञान आणि गनिमी कावा युद्ध पद्धती. महापुरूष तो असतो जो शून्यवत अवस्थेतून...

सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांना जय जवान आजी - माजी सैनिक संस्थेकडून अभिवादन

Image
जय जवान आजी - माजी सैनिक संस्थेतील जवानांच्या शुभहस्ते शिवध्वजारोहण  ======================== अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) भारतीय सैन्य दलात कार्यरत राहून आपल्या प्राणाची बाजी लावून, प्रसंगी परकीय शक्तींना आस्मान दाखवून देशाचे रक्षण करणारे जवान हे भारतमातेचे भूषण असतात. अशा वीर सैनिकांचा ज्या, त्या गावांना मोठा अभिमान असतो. अशाच जय जवान आजी - माजी सैनिक संस्थेतील जवानांच्या शुभहस्ते शिवध्वजारोहण करून अंबाजोगाईत रविवार, दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.   अंबाजोगाई शहरात मागील काही वर्षांपासून शिवजन्मोत्सव सोहळा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनिलकाका लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रविवारी शिवजन्मोत्सवानिमीत्त सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे विधीवत पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे बहुमान देत याही वर्षी जय जवान आजी - माजी सैनिक संस्थेतील जवानांच्या शुभहस्ते व सर्व शिवप्रेमी नागरिकांच्या प्रमुख उपस्...

समाजमाध्यमांचा आक्रस्ताळेपणा व आक्रमकतेमुळे पत्रकारिता धोक्यात - पद्मश्री प्रा.वामनराव केंद्रे

Image
वृत्तपत्र चळवळीला समाजाने बळकटी देण्याची गरज - निकिता पाटील वार्ता समूहाचा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न ======================== अंबाजोगाई (लोकनायक डिजीटल मिडीया न्युज नेटवर्क) आज समाजमाध्यमांचे रूप पाहिले तर आमच्यासारख्या सामान्य माणसाला चिंता वाटते की, आज समाजमाध्यमांचा जो भडीमार होत आहे. त्यातून काय घ्यावे आणि काय समाजाला द्यावे. परंतु, वृत्तपत्रांनी गेल्या शंभर वर्षांत जे योगदान पत्रकारितेसाठी दिले आहे. त्याचा विचार केला तर समाज माध्यमातील अपप्रवृत्तीमुळे तसेच आक्रस्ताळेपणा आणि अक्रमकपणा वाढल्यामुळे पत्रकारिता धोक्यात येत असल्याचे मत एनएसडीचे माजी संचालक तथा पद्मश्री प्रा.वामनराव केंद्रे यांनी व्यक्त केले. टिव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीच्या निवेदिका निकिता पाटील म्हणाल्या की, वृत्तपत्र चळवळीला बळकटी देण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. तरच वृत्तपत्राचे वैभव आणि अस्तित्व टिकून राहिल. अंबाजोगाई शहरात दैनिक वार्ता समूहाच्या वतीने आयोजित वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी नगरभूषण, सद्भावना, युवा गौरव पुरस्कार तसेच शहरातील गुणीजणांचा सन्मान...

कुंबेफळच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळेची शैक्षणिक सहल

Image
विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीतून मिळाली ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक माहिती ========================= अंबाजोगाई (लोकनायक डिजीटल मिडीया न्युज नेटवर्क)  तालुक्यातील कुंबेफळ येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुंबेफळ या शाळेची सन २०२२ - २३ या वर्षातील शैक्षणिक सहल अतिशय उत्साहात संपन्न झाली. सहलीच्या निमित्ताने ऐतिहासिक, भौगोलिक स्थळे पाहून आणि सांस्कृतिक विषयासंबंधीची मौलिक माहिती मिळाल्याने विद्यार्थी भारावले होते. सोमवार, दि.१३ फेब्रूवारी ते बुधवार, दि.१५ फेब्रूवारी २०२३ या कालावधीत आयोजित केलेल्या या सहली मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इ. ४ थी ते ७ वी वर्गातील एकूण ६१ विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका मीना हजारे, सहलप्रमुख संतोष गायकवाड यांच्यासह निळकंठ जिरगे, मंगल मुंडे, ललिता जाधव, माधुरी तोडकर, एम.एम.गायकवाड, दत्ता कसबे यांनी विद्यार्थ्यांना सहली दरम्यान ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक महत्त्व या विषयासंबंधी माहिती दिली. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना पंढरपूरचे विठ्ठल मंदीर, नरसोबाच्या वाडी...

टायगर ग्रुप मराठवाडाचा विधायक उपक्रम : आशादत्त गोशाळा येथे चारा वाटप, वृक्षारोपण तसेच अन्नदान

Image
मानवतावादी संत सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आशादत्त गोशाळा येथे चारा वाटप, वृक्षारोपण तसेच अन्नदान ===================== अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडिया न्युज नेटवर्क) मानवतावादी संत सेवालाल महाराज व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाई येथील आशादत्त गोशाळा येथे चारा वाटप, वृक्षारोपण तसेच अन्नदान करण्यात आले. या विधायक उपक्रमाच्या यशस्वितेसाठी टायगर ग्रुप मराठवाडा यांनी पुढाकार घेतला. अंबाजोगाई शहरातील आशादत्त गोशाळा येथे मानवतावादी संत सेवालाल महाराज व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दिनांक १५ फेब्रुवारी रोजी टायगर ग्रुप मराठवाडाचे अध्यक्ष गोरक्षक उमेशभाऊ पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.संत सेवालाल महाराज जयंतीचे प्रमुख पै.तिरूपती जयपाल राठोड यांनी हे उपक्रम राबविले, यावेळेस आशादत्त गोशाळा येथे चारा वाटप तसेच वृक्षारोपण करून अन्नदान असे सामाजिक उपक्रम आयोजित करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी एॅड.सचिन हुर्दळे, बालाजी पिंपळे, दीपक लामतुरे, स्वप्नील सोनवणे, राया धारेकर, बालाजी रुद्राक्ष, करण...

पूनमचंद परदेशी यांचा विधायक पुढाकार

Image
सामाजिक भान राखत वृद्ध, निराधार आणि गरजूना मिठाई वाटप करून वाढदिवस साजरा ======================= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क) आपला वाढदिवस मौजमजेत साजरा करण्याऐवजी समाजभान जोपासत आपल्या आनंदात समाजातील वृद्ध, निराधार आणि गरजूना सहभागी करून घेत मिठाई वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत येथील पत्रकार पूनमचंद सीताराम परदेशी यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळेस त्यांनी यापुढील काळात ही असेच समाजहिताचे उपक्रम राबविणार असल्याचा संकल्प बोलून दाखवला. यापूर्वी ही परदेशी यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना खाऊ आणि शालेय वस्तूंचे वाटप, गरजूना मदत केलेली आहे. पूनमचंद परदेशी हे मागील दोन वर्षांपूर्वी येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या प्राथमिक शाळेतून एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या ते "दैनिक परळी प्रहार" या वर्तमानपत्राचे तसेच "न्यूज टुडे 24" या न्यूज चॅनेलचे अंबाजोगाई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. अत्यन्त मनमिळाऊ व परोपकारी वृतीच्या परदेशी यांचा सामाजिक व धार्मिक उपक्रमात हिरीरीने सहभाग असतो ह...

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

Image
भारज येथे काँग्रेसच्या "हाथ से हाथ जोडो" अभियानास जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद ========================= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क) आज भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे मोडून पडलेली ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था काँग्रेस पक्षच सुधारू शकतो, सामान्य माणसाला आर्थिक ताकद देण्याचे काम हे काँग्रेस पक्षच करू शकतो, अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात काँग्रेस नेत्या खासदार सौ.रजनीताई पाटील यांचे केलेले निलंबन हे चुकीचे असून, ही मुस्कटदाबी काँग्रेस पक्ष कदापिही सहन करणार नाही, आम्ही काँग्रेस नेत्या खासदार सौ.पाटील यांच्या निलंबनाचा जाहीर निषेध करीत आहोत, हा देश काय आदानीला विकलाय का..? असा सवाल करून अदानी व भाजपाचे पंतप्रधान मोदी यांचे काय नाते आहे, हे केंद्र सरकारने जाहीर करावे. कारण, जो अदानी मागील आठ वर्षापूर्वी देशातील उद्योगपतींच्या यादीत तब्बल 609 व्या क्रमांकावर होता, तो अचानक भाजपच्या सत्तेच्या काळात श्रीमंत उद्योगपतीच्या यादीत दोन क्रमांकावर कसा काय आला याचे उत्तर भाजपा व पंतप्रधान मोदी यांनी भारतीय जनतेला द्यावे, आदानीकडे अचानक एवढे पैसे कुठून आले..? शासनाच्या तिजोरीवर डल्ला...