भारज येथे काँग्रेसच्या "हाथ से हाथ जोडो" अभियानास जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद ========================= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क) आज भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे मोडून पडलेली ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था काँग्रेस पक्षच सुधारू शकतो, सामान्य माणसाला आर्थिक ताकद देण्याचे काम हे काँग्रेस पक्षच करू शकतो, अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात काँग्रेस नेत्या खासदार सौ.रजनीताई पाटील यांचे केलेले निलंबन हे चुकीचे असून, ही मुस्कटदाबी काँग्रेस पक्ष कदापिही सहन करणार नाही, आम्ही काँग्रेस नेत्या खासदार सौ.पाटील यांच्या निलंबनाचा जाहीर निषेध करीत आहोत, हा देश काय आदानीला विकलाय का..? असा सवाल करून अदानी व भाजपाचे पंतप्रधान मोदी यांचे काय नाते आहे, हे केंद्र सरकारने जाहीर करावे. कारण, जो अदानी मागील आठ वर्षापूर्वी देशातील उद्योगपतींच्या यादीत तब्बल 609 व्या क्रमांकावर होता, तो अचानक भाजपच्या सत्तेच्या काळात श्रीमंत उद्योगपतीच्या यादीत दोन क्रमांकावर कसा काय आला याचे उत्तर भाजपा व पंतप्रधान मोदी यांनी भारतीय जनतेला द्यावे, आदानीकडे अचानक एवढे पैसे कुठून आले..? शासनाच्या तिजोरीवर डल्ला...
कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या राज्यस्तरीय कृषी कवी संमेलनातून मौलिक चिंतन - ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा ========================= अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने यावर्षी ही उंदरी येथे राज्यस्तरीय कृषी कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे, या निमित्ताने मान्यवर कवी दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी त्यांच्या बहारदार काव्य रचनांमधून मौलिक चिंतन मांडतील असा आशावाद ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी कृषी कवी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने दिवंगत विद्यार्थी प्रिय प्राचार्य कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त गुरूवार, दिनांक 18 मे रोजी सायंकाळी “काव्यसंध्या" हे निमंत्रित कविंचे कृषी कवी संमेलन उंदरी (ता.केज) येथे आयोजित करण्यात आले होते. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदेव वाकुरे (सेवान...
मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यातील जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांची ऑनलाईन बैठक ============================================= मुंबई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) "चळवळीच्या माध्यमातून आपण पत्रकारांचे अनेक प्रश्न सोडविले आहेत. उर्वरीत प्रश्नांसाठी आपला संघर्ष सुरूच आहे. पत्रकारांना न्याय हक्क मिळवून देणे हे आपले ध्येय आहे. पत्रकारांचे संघटन म्हणून आपण आज मराठी पत्रसृष्टीत प्रथम क्रमांकावर आहोत. बड्या वृत्तपत्रांचे धनदांडगे मालक व सरकार आपल्या विरोधात आहेत, आपल्या संघटनेला ते चहुबाजुंनी कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत, आपले फळांचे झाड आहे, त्या झाडाला बहर येऊ द्यायचा की वांझोटे ठेवायचे ? याचा आपण गंभिरपणे विचार करावा. पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून परिषदेच्या प्रसिद्धी विभागाने अधिक जागृत राहून परिषद करीत असलेले विधायक काम सक्षमपणे लोकांपर्यंत पोहचविले पाहिजेत’’ असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी राज्यातील जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत मार्गदर्शन करताना केले. या बैठकीत एस.एम.देशमुख पुढे म्हणाले की, ‘‘विरोधकांच्या अपप्रचाराक...
Comments
Post a Comment