कृषिच्या विद्यार्थ्यांनी अद्ययावत ज्ञान व तंत्रज्ञान अवगत करून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे - संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ.धर्मराज गोखले यांचे आवाहन
कृषि महाविद्यालय,अंबाजोगाई येथे नवप्रवेशित विद्यार्थी अभिमुखता समारंभाचे आयोजन
=========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
कृषि महाविद्यालय अंबाजोगाई येथे दिनांक ३० नोव्हेंबर रोजी शैक्षणिक वर्ष २०२२-२३मधील नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी कृषि पदवी शिक्षणाची ओळख आणि प्राध्यापक, विद्यार्थी व पालक सुसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या अभिमुखता कार्यक्रमात नूतन शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना बी एस्सी (मानद) कृषि पदवी अंतर्गत कार्यक्रम, विषयनिहाय मूल्यमापन, महाविद्यालयातील उपलब्ध सोयी- सुविधा, विविध कृषि विषयक विभागांची ओळख व कार्यपद्धती, कृषि शिक्षणातील उच्चशिक्षण, नोकरी व व्यवसायाच्या संधी याबाबत माहिती, महाविद्यालयातील उच्चविद्या विभूषित प्राध्यापक व कर्मचारी यांचा परिचय आणि विद्यार्थी, पालक व प्राध्यापक यांचा सूसंवाद घडवून आणला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता ( कृषि) डॉ.धर्मराज गोखले हे होते. कार्यक्रमास कृषि महाविद्यालय अंबाजोगाईचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.संजीव बंटेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.धर्मराज गोखले म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिकता, बंधुभाव, सौहार्दता तसेच आपापसातील आपुलकी, जिव्हाळा व सहकार्याची भावना वृद्धिंगत व्हावी या दृष्टिकोनातून महाविद्यालयातून अभिमुखता कार्यक्रमासारखे उपक्रम आवश्यक असतात. कृषिच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी हा केंद्रस्थानी मानून कृषि विषयक ज्ञान व तंत्रज्ञान अवगत करून त्याचा शेतकऱ्यांसाठी पुरेपूर उपयोग केला पाहिजे तसेच राष्ट्र व समाजाप्रती सेवाभाव वृद्धिंगत करून देशाच्या प्रगतीत योगदान दिले पाहिजे. आपल्या शैक्षणिक काळामध्ये जीवनविषयक मूल्ये, संस्कार व आत्मविश्वास वृद्धिंगत करून शिक्षण, संशोधन व विस्तार कार्य या त्रिसूत्रीचा पुरस्कार करावा तसेच उद्योजक निर्माण होण्यासाठी नियमित बौद्धिक व प्रात्यक्षिक अभ्यासक्रम परिपूर्ण करणे आवश्यक आहे. आपल्या मनोगतात सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.संजीव बंटेवाड यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व तसेच कर्तव्य व जबाबदाऱ्या यांचेही महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी जिमखाना विभागाचे डॉ.रविंद्र चव्हाण, परिक्षा विभागाचे डॉ.संजय राठोड, शिक्षण विभागाचे डॉ.अजित पुरी, मुलांचे वसतिगृह अधिक्षक डॉ.सुहास जाधव, मुलींचे वसतिगृह अधिक्षिका डॉ.विद्या तायडे, शिष्यवृत्ती विभागाचे प्रा.वैभव कांबळे यांनी संबंधित विभागाचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सौ.रोहिणी करले, सुभाष पाचपुते, गोविंदराव सोनवळे या पालकांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यालयातील सोई-सुविधा तसेच महाविद्यालय परिसराविषयी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अजित पुरी यांनी मांडले, सूत्रसंचालन विद्यार्थीनी कु.पुजा गिरी यांनी केले तर आभार विद्यार्थीनी कु.माधुरी करडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.आर.सी.महाजन, डॉ.रविंद्र चव्हाण, डॉ.दिपक लोखंडे, डॉ.सुहास जाधव, डॉ.योगेश वाघमारे, डॉ.विद्या तायडे, डॉ.अजित पुरी, प्रा.सुनील गलांडे, प्रा.सी.बी.अडसूळ, प्रा.वैभव कांबळे, अरूण तोंडारे, अनंत मुढे, गुंडावार, विजेश जाधव, बाबासाहेब वारकरी, अनिल खेडेकर, राजेश रेवले, प्रकाश मुजमुले, नंदकुमार मोरे आदिंनी परिश्रम घेतले.
======================
Comments
Post a Comment